मुंबई (वृत्तसंस्था) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे दिसत आहे. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात”, असं मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आज पहिल्यांदाच प्राजक्त तनपुरे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे म्हणाले.
मंत्री जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले, “राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे दिसत आहे. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात”
दोन दिवसांपूर्वी ईडीनं (ED) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी या साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली होती. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे. एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. तनपुरेंच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे.