धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील राज राजेश्वर सारजेश्वर महादेव मंदिरात भोले सरकार मित्रपरिवारतर्फे खान्देशात प्रथमच कावड यात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेचे स्वरूप दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता तापी नदीवर जाण्यासाठी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथून गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्यांना कावड यात्रेस जायचे असल्यास त्यांनी भोले सरकार मित्र परिवास संपर्क करावा, असे आव्हान करण्यात आले आहे.
या कावड यात्रेचे स्वरूप 21 ऑगस्ट रोजी सकाळी पावन पालखी सहित धरणगाव शहरात प्रवेश करेल. यानंतर तेथून पुढे व संपूर्ण गावात भ्रमण करून राज राजेश्वर महादेव मंदिरात रुद्र अभिषेक करून सांगता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोले सरकार मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.