मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली वेगात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिंगणात उतरले आहेत. आमचा विठ्ठल चांगला, मात्र त्याच्या अवतीभवती असलेचार -पाच बडव्यांनी त्यांना घेरले. त्यामुळे ‘मातोश्री’ बदनाम होत आहे.” अशा शब्दात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.
मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी, पत्रकारांशी बोलताना “शिवसेनेतील फुटीसाटी हे बडवेच कारणीभूत आहेत. यांच्यामुळेच आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट होत नाही, त्याचा वेळ मिळत नाही. आशा खोचक शब्दात टीका केली. बडव्यांची नावे घेणार नाही, पण मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय? कौशल्य काय? हे सर्वांनाचा माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही.”, असा आरोपही भुयार यांनी केला आहे.
तसेच, “मी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबतच आहे आणि राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जसा आदेश देतील, त्याप्रमाणे मी काम करणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात-लवकर बदलण्याची गरज आहे. शिवसेनेत बंड करून गेले आमदार दोन-तीन दिवसांत परत येतील.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.