जम्मू (वृत्तसंस्था) पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी दुपारनंतर पाकिस्तानकडून सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी पहाटेपर्यंत चालू होता. या दरम्यान मोठे शस्त्रे आणि मोर्टारचा देखील वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने देखील याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले.
गुरुवारी दुपारी सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी सकाळपर्यंत होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले तर तीन जखमी झाले. वृत्तसंस्थेने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. एलओसीच्या काही भागात पाकिस्तानी सैनिक सतत उकसावण्याचे काम करत आहे. गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरचे पुंछ सेक्टर निशाण्यावर होते. भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरू झाला. त्यांना भारतीय नागरिकांना लक्ष्य करायचे आहे. मानकोट सेक्टरमध्ये सर्वाधिक गोळीबार झाला. येथील काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. आम्ही पाकिस्तानचे पाच सैनिक ठार केले तर तीन जखमी आहेत. त्यांनी अनेक नवीन बंकर बनवले आहेत. त्यांनाही उद्ध्वस्त केले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सुमारे २ तास जोरदार गोळीबार झाला.
















