धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे, गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्ताह काळात २६४ सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला होता. या सप्ताहात श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री रामरक्षा पाठ, श्री हनुमान चालीसा तसेच श्री स्वामी चरित्र पाठ, श्री दुर्गासप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती तसेच विविध देवतांचे यज्ञ याग झाले. या सप्ताहात अध्यात्मिक व समाजप्रबोधनपर विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले. सण वार, व्रत वैकल्य यांची प्रात्यक्ष मांडणी करुन प्रबोधन करण्यात आले. त्यात सेंद्रिय शेती, वास्तुशास्त्र, आहार व आरोग्य, बालसंस्कार मानवी जीवनात येणाऱ्या समस्या या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सत्ताह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी आरती करण्यात आली. तसेच तालुक्यातील १० हजारपेक्षा जास्त भाविक, सेवेकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व सेवेकरी परिवारांनी सहकार्य केले.