शहादा(प्रतिनिधी) : येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील अनेक महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव अध्यक्षस्थानी तर सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव मा. सौ. वर्षाताईसाहेब जाधव, संस्था प्रतिनिधी चि. हिमांशूभाऊ जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक मा. श्री. संजयजी राजपूत सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एन. पाटील, नादब्रह्म सांगितिक समूहाचे श्री. चंद्रकांतजी टेंभेकर, श्री खुशालभाई उपाख्य छोटूभाई पाटील, प्रा. डॉ. आर. बी. मराठे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक अधिकारी प्रा. जी. एस. पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक महिला अधिकारी प्रा. मालिनी अढाव, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. अनिल गोसावी, प्रा. डॉ.भारत चाळसे, प्रा. अनिल साळुंखे, राष्ट्रीय सेवा योजना स्थानिक एकक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अशोक तायडे मंचावर उपस्थित होते. छान रंगलेल्या या सांगितिक मैफिलीच्या समापनानंतर लगेचच पारितोषिक वितरणही करण्यात आले. या स्पर्धेत क्रमशः कु. जयश्री संजय गिरासे- वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादा, प्रथम; कु. जयश्री नगीन महाजन- शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विज्ञान महाविद्यालय शहादा, द्वितीय; चेतन दयाराम शिंदे- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे फार्मसी महाविद्यालय शहादा, तृतीय; कु. भावना दादासाहेब शिरसाठ- सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कला महाविद्यालय शहादा, चतुर्थ; तर कु. हर्षदा भिका पाटील- ग्राम विकास संस्था संचालित कला महाविद्यालय बामखेडा ही पाचव्या स्थानी राहिली. या नवगायक स्पर्धकांनी स्पर्धेवर आपली छाप उमटवत पुरस्कार पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांसोबत सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव म्हणाले की संगीत माणसाच्या जीवनात अंतर्बाह्य भरून आहे. संगीत जीवन जगण्याची कला शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. आज झालेल्या या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमुळे गाणाऱ्याच नव्हे तर श्रोत्यांमध्येही एक नवी ऊर्जा निर्माण झाली. देशाबद्दलचे प्रेम वाढीस लागले. देश नेहमी प्रथम आहे. देशाची वंदना महत्त्वाची. अशा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धांनी वातावरणात चैतन्य निर्माण होते. या अशा स्पर्धांमधून उत्कृष्ट गायक निवडला जाऊन त्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संध्या उपलब्ध होतात. विजेत्यांचे अभिनंदन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांनी नव गीत गायकांना नित्य गीत गायनाचा रियाज करण्यावर भर देण्याच्या सल्ला दिला. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रो. डॉ. ए. एन. पाटील, स्पर्धेचे परीक्षक श्री. चंद्रकांतजी टेंभेकर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंग्रजी विभागाचे प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील यांनी सातपुड्यातील शिक्षण तपस्वी, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मसाक्षी मा. स्व. नानासाहेब जाधव यांच्यावर केलेली स्वरचित कविता गाऊन पेश केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक तायडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. बी. मराठे तर आभार प्रकटन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.