TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकांनी नवीन सत्ताबदल स्वीकारलं आणि लोकशाही बळकट केली : पंतप्रधान मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “राष्ट्रपतींचं भाषण भारतातील १३० कोटी नागरिकांच्या संकल्पशक्तीचा परिचय आहे. “जेव्हा ब्रिटीश भारत सोडून गेले तेव्हा भारताला कधीही कोणी राष्ट्र बनवू शकणार नाही असं म्हणाले होते. पण भारतवासीयांनी ही शंका खोडून काढली. आपण जगासाठी आशेचा किरण म्हणून उभे राहिलो आहोत. अनेक निवडणुका झाल्या, सत्ता परिवर्तन झाले. लोकांनी नवीन सत्ताबदल स्वीकारले आणि लोकशाही बळकट केली,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संकटाच्या काळातही हा देश कसा आपला मार्ग निवडतो आणि यश मिळवत पुढे चालत राहतो हे सर्व राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. त्यांचा प्रत्येक शब्द देशवासियांमध्ये विश्वास निर्माण करणारा आहे. त्यांचे आभार जितके व्यक्त करु तितकं कमी आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. मोदींनी यावेळी महिला खासदारांचं विशेषकरुन अभिनंदन केलं. “स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक देशाला एक संदेश द्यायचा आहे, जो त्याला पोहोचवायचा असतो. प्रत्येक देशाचं एक मिशन असतं ते पूर्ण करायचं असतं. प्रत्येक देशाची एक निती असते जी प्राप्त करायची असते असं सांगितलं होतं. कोरोना संकटात भारताने स्वत:ला सांभाळलं आणि इतरांना मदत केली. भारताने आत्मनिर्भर होऊन एकामागोमाग एक अनेक पावलं उचलली,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

“जगाने ज्याप्रकारे संकट झेललं आहे त्यानंतर अशा स्थितीत भारत जगापासून दूर राहू शकत नाही. आपल्याला एक महत्वाचा देश म्हणून पुढे यायचं आहे. फक्त लोकसंख्येच्या आधारे आपण हे करु शकत नाही. नवीन वर्ल्ड ऑर्डरसाठी भारताला सशक्त व्हावं लागेल. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आत्मनिर्भर होण्यासाठी जे बदल आवश्यक आहेत ते करावे लागतील असंही त्यांनी सांगितलं. “कोरोना संकटात एका अज्ञात शत्रूविरोधात आपण लढत होतो. मोठ्या देशांनी गुडघे टेकले असताना भारतात काय होईल याबाबतही शंका निर्माण केली जात होती. पण लोकांच्या शिस्तीमुळे आपण जगाला करुन दाखवलं आहे. आपण घऱात बसून आपल्या त्रुटींसोबत लढू, पण विश्वासाने सामोरं जाण्याचा निर्धारही केला तरच जग स्वीकार करेल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही

आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीच्या माहितीचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. “कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४९ कोरोनाबाधित, २७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त क्लार्कला सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ उकळलेले 18 लाखपैकी 17 लाख रुपये जळगाव पोलिसांनी मिळविले परत !

December 27, 2024

एरंडोल तालुक्यात भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर !

February 23, 2022

संतापजनक ! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे ; गुप्तांगही दाखवले

February 2, 2022

मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट मिळणार नाही ; केंद्राच्या भूमिकेवर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group