मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय मतदार याद्या येत्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका होणार असून व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झाला आणि अखेर निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकबाबत माहिती दिली.
निवडणूक कार्यक्रम
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहे.. अर्ज दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर पर्यंत असून अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर पर्यंत आहे. तसेच अर्ज छाननी -18 नोव्हेंबरला होणार आहे. तर माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर असेल. अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर आहे. तसेच निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- 26 नोव्हेंबर जाहीर होईल. मतदानाचा दिवस 2 डिसेंबर असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
















