जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “स्वराज्य महोत्सव” उपक्रम व “माझी वसुंधरा ३.०” उपक्रम अंतर्गत १००० वृक्षांची लागवड दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी सुबोनियो पक्षी घराजवळ,मेहरून तलाव येथे सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.
आयुक्त डॉ विद्या गायकवाड,महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील व सर्व नगरसेवक यांच्यासह महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असून देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. सदर महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विविध स्थळावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील वृक्षप्रेमी नागरीकांनी सुद्धा या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे आणि सचिव विजय वाणी यांनी केली आहे.