TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतून दबाव वाढला

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राठोडांची मंत्रिपदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपनं वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यात विलास चव्हाण आणि अरुण राठोड सापडत नसल्यानं या प्रकरणातलं गूढ आणखी वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसेच मत व्यक्त केले आहे. राठोड मात्र राजीनामा देण्यास तयार नसल्याचे समजते. पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची संधी आयतीच मिळेल.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

संजय राठोड यांना ‘मातोश्री’चे अभय असल्याचे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राठोड यांची बाजू लावून धरली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. प्रत्येक वेळी फडणवीस यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना अभय दिले होते. या पाश्र्वभूमीवर राठोड यांचा लगेचच राजीनामा घेऊ नये, असा मतप्रवाहही पक्षात आहे. विधानसभेत फडणवीस यांनी आरोप केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांवर झालेले आरोप आणि या मंत्र्यांना कसे पाठीशी घातले याची जंत्रीच सभागृहात सादर करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. एका युवतीच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी मंत्र्यांचे नाव पुढे येणे, त्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये पसरणे, त्यात आवाज असलेली राठोड नावाची व्यक्ती गायब होणे यातून संशयाला वाव मिळतो. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत राठोड यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतल्याचे समजते. आगामी अधिवेशनात राठोड प्रकरण अडचणीचे ठरण्याच्या शक्यतेमुळेच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्याचे समजते.

दबावतंत्र : राजीनाम्यासाठी दबाव येत असल्यानेच संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. समाज आपल्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करून ‘मातोश्री’वर दबाव आणला. कोरोनाचे सारे नियम पायदळी तुडविले. समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असे भासवण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे विदर्भ आणि मराठवाडय़ातील समाजाच्या नेत्यांकडून सांगण्यात येते.

पूजाच्या मोबाईलवर राठोडांचे ४५ मिस्ड कॉल्स?

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत आले आहेत. कारण ज्यादिवशी पूजाचा मृत्यू झाला, त्यादिवशी तिच्या मोबाईलवर संजय राठोड नावानं ४५ मिस्ड कॉल आले होते, असा खळबळजनक आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशी भविष्य 30 मे 2024 !

May 30, 2024

नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने होणारी हानीसंदर्भात डॉ. नितु पाटलांचे वरणगाव मुख्याधिकऱ्यांना निवेदन

October 21, 2024

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

September 25, 2024

डाॅ.नितीन पाटील यांची राष्ट्रवादी डॉ.सेलच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती !

December 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group