TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२१ वर्षाखालील मुलांना लग्न करण्यास बंदी पण लिव्ह-इन मध्ये राहण्याची सूट ; न्यायालयानं सुनावला निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2021
in कोर्ट, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्न करण्यासाठी मुलींच्या वयात वाढ करण्यावरुन वाद सुरु आहे. याच दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने नुकत्याच एका प्रकरणी असे म्हटले की, २१ वर्षाखालील कोणताही तरुण पुरुष लग्न करु शकत नाही. परंतु त्याला १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलेसोबत तिची परवानगी असल्यास त्यांना कपल प्रमाणे लिव्ह इन मध्ये राहण्यास काही हरकत नाही.

उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१८ च्या निर्णयाशी संबंधित आहे. कोणत्याही प्रौढ व्यक्ती (१८ वर्षापेक्षा अधिक वय) विवाह न करता एक कपल म्हणून राहू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं होतं. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. दोघांचं वय १८ वर्षापेक्षा अधिक आहे, परंतु हिंदू विवाह कायद्यानुसार, मुलगा २१ वर्षांचा होईपर्यंत विवाह करू शकत नाही. यामुळे या जोडप्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमुळे कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका आहे, असं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं. तसंच त्यांचे कुटुंबीय त्यांची हत्या करतील अशी भीती त्यांना वाटत असल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं होतं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य आणि जीवनाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल म्हणाले. “ते प्रौढ आहेत, परंतु त्यांचं वय विवाहयोग्य नाही, कवळ या कारणामुळे भारताचे नागरिक या नात्यानं देशाचं संविधान याचिकाकर्त्यांना तिच्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं. याशिवाय न्यायालयानं गुरदासपूरच्या एसएसपींना या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचेही आदेश दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
कोर्ट

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

April 19, 2025
Next Post

राज्यात 'रोकशाही' आणि 'रोखशाही' सुरु ; फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

November 2, 2021

पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविक : अतुल भातखळकर

May 14, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १० जानेवारी २०२३ !

January 10, 2023

अमळनेर येथे सरदार पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group