TheClearNews.Com
Friday, January 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध करा ; बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा - पिक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणा-या बँकांवर होणार कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in कृषी, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरीपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बीयाणे मिळावे तसेच खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच पेरणी करावी खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस बियाणांची विक्री करणार्‍या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा, पावसाविषयीचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पावसाचे अंदाज शेतक-यांना वेळोवेळी कळत राहिले तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल. त्यादृष्टीने शेतक-यांमध्ये सातत्यपूर्ण जाणीवजागृती करावी तसेच अवकाळी पावसाने वीजपुरवठा यंत्रणेचे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्त्या, विस्तार व इतर कामे वेळेत पूर्ण करावी, गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देत बोगस बियाणे व खतांबाबत विशेष दक्ष राहण्याचे बजावले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.

या बैठकीस सर्वश्री.आ. चिमणराव पाटील आ.एकनाथराव खडसे, आ.संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल ,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे आदि उपस्थित होते. तर यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन,रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना, मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना, कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषी औजारे वाटप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), चार्याची आवश्यकता व उपलब्धता, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसानाबाबत जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत आढावा घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले. त्यांनी सन 2022-23 व सन 2023- 24 मधील योजना निहाय उदिष्ट व सद्यस्थिती ची माहिती विषद केली. आभार जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले की खरीप हंगामासाठीची आवश्यक ती माहिती व शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.

READ ALSO

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकूण वहितीखालील क्षेत्र 8.48 लाख हेक्टर असून खरिप क्षेत्र 7.70 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांत कापसाचे प्रस्तावित क्षेत्र 5.50 लाख हेक्टर, व इतर 2.13 लाख हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यानुसार एकूण प्रस्तावित क्षेत्र 6.63 लाख हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप पूर्ण मशागतीची कामे करतांना स्वताची काळजी घ्यावी , शक्यतोवर सकाळीच शेत शिवारातील कामे उरकून घ्यावी. एकाच पिकावर विसंबुन न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बीयाणे, खतांचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावरभरारी पथकांची स्थापना करण्यात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांना व खतांचा कृतीम टंचाई करणाऱ्या वर कृषी अधिकारी यानी धडा शिकविण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी. बियाणे व खते बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तक्रार घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा.

अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी नवीन हवामान यंत्र अपडेट करून मनेरगा किंवा इतर शासनच्या योजना मधून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती पोहचून लाभ देण्याबाबत तत्पर राहा. लोड शेडींग बंद असून महावितरणाने शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करण्याबाबत दक्ष राहावे . पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ही कामे युद्धस्तरावर राबवून मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्रभावीपणे राबवावीबागायती कापूस पीकाची लागवड करताना शेतकऱ्यांना पीकाला पाणी देता यावे याकरीता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात पुरेशी वीज उपलब्ध करुन द्यावी. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळीचा आपल्या जळगाव जिल्ह्यातील 18 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने 20 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.यावेळी तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात असे आ.चिमणराव पाटील व आ.एकनाथराव खडसे यांनी सूचित केले.

कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करा

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत ,728 कोटी 94 लक्ष पिक कर्ज वाटप उदिष्टपैकी 48 % म्हणजे 348 कोटी 86 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर राष्ट्रीयकृत बँक ( 860 कोटी 96 लक्ष ), ग्रामीण बँक ( 26 कोटी 32 लक्ष) व खाजगी बँक (323 कोटी 35 लक्ष ) असे पिक कर्ज वाटप उदिष्ट असताना अद्याप पर्यंत दमडीही पिक कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व बँकांमार्फत एकूण 1939 कोटी 58 लक्ष उदिष्ट असून त्यापैकी केवळ 348 कोटी 86 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी सर्व बँकांमिळून 2 लक्ष 42 हजार 204 शेतकऱ्यांना 2149 कोटी उद्दिष्टापैकी 1794 कोटी 39 लक्ष म्हणजे 84 % पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. कर्ज वाटपा मध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ना.गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटक नाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले विविध कामांचे उद्घाटन व वाटप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बांधावर 10 टन खताचे वाटप करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 5 हजार 45 लाभार्थ्यांना 31 कोटी 24 लाख रुपयांचे ट्रंकतर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर व अनुषंगिक औजारे अनुदान प्रातनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाची पाहणीही मान्यवरांनी केली. खरीप हंगाम सन 2022 राज्यस्तरीय ज्वारी पिक अंतर्गत शासनाने निवड केलेल्या ज्ञानेश्वर चिंतामण पाटील गहुखेडे ता. रावेर व अर्जुन दामू पाटील वडगाव ता, रावेर या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.

पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकरा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण ४६० गावांची निवड करण्यात आली असून आज पावेतो जिल्ह्यातील १ लक्ष ०४ हजार ३९५ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असून त्यापैकी आज पावेतो ७० हजार ३०१ शेतकरी बांधवांना रक्कम रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेला आहे. तसेच ६२१३लाभार्थ्यांचे ५७ कोटी २१ लक्ष चे अनुदान वितरण अंतिम टप्यात आहे. यात ठिबक सिंचन संच ,शेळी पालन , शेडनेट गृह ,शेततळे, पौलीहाउस, इलेक्ट्रिक मोटारपंप ,फळबाग व वनिका आधारित शेती,,पाईप , रेशीम उद्योग अश्या 22 प्रकारच्या बाबींवर रुपये ४९९ कोटी ८८ लक्ष इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे. त्यामुळे पोकरा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
जळगाव

अजितदादा पवार यांना अशोक जैन यांची भावपूर्ण आदरांजली !

January 29, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
Next Post

जळगाव ‍परिमंडलात वर्षभरात वीजचोरीची 11794 प्रकरणे उघडकीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे’ : संजय राऊतांचं थेट भाजपला आव्हान

September 8, 2021

‘मविआ’ला सुप्रीम कोर्टाचा झटका ; अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच

June 20, 2022

‘बंद करुन दाखवल्याचंही श्रेय घेणार का?’ ; ​नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

September 11, 2021

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण !

October 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group