जळगाव प्रतिनिधी : माणसांच्या जगण्याला असणाऱ्या विविध छटा आणि यातून निर्माण होणारा वर्ग कलह, जाती व्यवस्था, काळे गोरे भेद हे सार माणसाच्या दुःखाला, वेदनेला, अन्यायाला जवळ करणारं आहे आणि यातूनच अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध विद्रोह करणे म्हणजे क्रांतीची सुरुवात असते असे मत नांदेड येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या आयोजन समितीच्या वतीने आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार होते. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते कवी लोकनाथ यशवंत, उर्दूचे प्रख्यात शाहीर मेहताब आलम,डॉ. अब्दुल करीम सालार यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकुलसचिव पदी पदोन्नती झाल्याबद्दल विवेक संदानशिव, नीट परीक्षा उत्तीर्ण संजय साळुंखे, बाहेती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डॉ. राहूल बनसोड यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात मंगल बी पाटील, कवी साबीर मुस्तफाबादी, डॉ. प्रदीप सुरवाडकर, मुश्ताक कारिमी, मनोहर गाढे, दिलीप सपकाळे राजेंद्र पारे, इमरान फरिश, प्रा. योगेश महाले, बुलढाणा येथील कवी भाऊ भोजने,डॉ. मिलिंद बागुल,प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषेतील कविता सादर केल्या.
याप्रसंगी भोपाळ येथील उर्दू भाषा साहित्यिक मेहताब आलम यांनी साहित्यातून विचार आणि माणसं जोडली पाहिजे, धर्म हा माणुसकीचा जोपासला जाण्याची वेळ आहे. ही माणुसकी तुमच्या आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा ऋणानुबंधाची नाती दृढ करणारी असते. ही जाणीव प्रत्येकाला असणे त्याच्या जगण्याची दिशा ठरवणारी होऊ शकते. यातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाऊन माणसं माणसाशी माणुसकीच्या नात्याला दृढ करण्यासाठी स्पर्धा लावतील. अशा स्वरूपाचे मनोगत व्यक्त करत आपल्या कवितांमधून माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींचा विचार त्यांनी मांडला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना करीम सालार यांनी कविता साहित्य भाषा अनेक जाती-धर्माच्या माणसांना जोडणारा दुवा असतो आणि हा दुवा जपणे आणि जोपासण्याची आजच्या माणसाला गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
सन्मान पत्राचे वाचन डॉ. मिलिंद बागुल, प्रा. प्रीतीलाल पवार, कवी साबीर मुस्तफाबादी यांनी केले. विचार मंचावर मुकूंद सपकाळे, जयसिंग वाघ प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे, प्रभारी प्राचार्य डॉ. वकार शेख यांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ वकार शेख यांनी मानले. कार्यक्रमास समीक्षक जयसिंग वाघ, प्रा. देवेंद्र इंगळे प्रा.किसन हिरोळे, महेंद्र केदार, चेतन ननवरे एडवोकेट आनंद कोचुरे, यू.एन.सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुनील सोनवणे, एडवोकेट आकाश सपकाळे, इफ्तेकार सर, असर सर, प्रा.डॉ. गौतम भालेराव, रमेश सोनवणे, चंदन भालेराव, सोमा भालेराव, राजेंद्र मिस्त्री सुतार, चंद्रगुप्त सुरवाडे, अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.















