जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाभरातील शाळा व संस्थाचालकांना विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश काढण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे सचिव अँड. कुणाल पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, चेतन चौधरी, गौरव वाणी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सद्य स्थितीचा विचार केला असता पूर्ण लॉकडाउन संपलेले नाही. त्यामुळे पालकांची जीव घेनी कसरत सुरू आहेत त्याना घर सांभाळून शाळेची फी भरण्यास त्रास होत आहे तसेच मुलाना शिक्षण ऑनलाईन घ्यावे लागत आहेत तेव्हा मोबाईल व त्याच्या साथी लागणारा संकेतस्थळ चा खर्च देखील करावा लागत आहेत. शाळा ह्या बंद आहेत आपल्या शेजारचे बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी देखील आदेश त्यांच्या जिल्ह्यात काढलेले आहेत तसे आदेश आपल्या कडे देखील काढण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.