उस्मानाबाद (वृत्तसंस्था) वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता स्वीकारत असताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास १ लाख १० हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे. १ लाख १० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार आरोपी जानकर याच्या हस्ते स्विकारले.
तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद यांनी ही कारवाई केली.