जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील गोद्री हे महाकुंभ घेण्यासाठीचे तीर्थक्षेत्र नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळण कोणत्या शीर्षकाखाली, कशा पद्धतीने निधी खर्च करण्यात आला आणि का? याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील (Mla Anil Patil) यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. (Jamner Godri Banjara Kumbha)
जिल्हा नियोजन समितीची विभागीय बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. बैठकीला आ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाकुंभाच्या नावाखाली कोणत्याच प्रकारचे ऑडिट होणार नाही, याची खात्री तसेच नाशिक कुंभमेळ्याचा अनुभव जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात महाकुंभ होत आहे. त्यात शासन निधीची उधळण होत असल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला.
तसेच सत्तेतील आमदारांना कुंभात सहभागी न करता दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत. ते एकेकाळी भाजपमध्ये होते. त्यांना भाजपची प्रणाली चांगलीच माहिती आहे. त्यांनी महाकुंभाला भेट देऊन पाहणी करावी. शासकीय निधीबाबत त्यांनी तेथे येऊन चौकशी करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी सर्व आमदारांना कुंभाबाबत निरोप दिले होते. आमदारांनी तेथे यायला हवे, असे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले.