TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : चीनने भारताच्या अरूणाचल प्रदेशात उभारले खेडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास १०० घरे आहेत. धक्कादायक म्हणजे हे गाव सीमारेषेपासून ४.५ किमी आत अंतरावर वसवले आहे. लडाखपाठोपाठ आता अरूणाचल प्रदेशात भारत चीन संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. अरूणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत चीनने १०० पक्क्या घरांचं खेडं उभारल्याचा दावा भाजप खासदार तापीर गाओ यांनी केला आहे.

चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर शेजारी देशही त्रस्त आहेत. लडाखमध्ये भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्षही झाला. त्यानंतर लडाखमधील तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूने लष्करी चर्चा सुरू आहेत. तर, दुसऱ्या बाजूला अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने आगळीक केली आहे. चीनने हे गाव सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ वसवले आहे. एका सॅटेलाइट फोटोमधून याचा खुलासा झाला आहे. या भागावर भारत आणि चीनचा दावा असून दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र संघर्षाचे ठिकाण म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. चीनने अरूणाचल प्रदेशात १०० घरांचे खेडं, एक बाजारपेठ आणि दोन लेनचा पक्का रस्ता भारतीय हद्दीत उभारल्याचा दावा गाओ यांनी केला आहे. या दाव्याची दखल घेत भारतीय परराष्ट्र खात्याने देशाची सार्वभौमता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असा दावा केला आहे. तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सरकार पुन्हा चीनला क्लिनचीट देणार का, असा सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने नवीन गाव वसवले आहे. राज्यातील अप्पर सबनसिरी जिल्ह्यातील तसरी नदीच्या काठावर हे गाव वसवले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, तर भारताचा हा भाग आहे. दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की अरुणाचल प्रदेशसह नागरिकांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी रस्ते आणि पुलांसह सीमेच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांना भारताने वेग दिला आहे.

याआधीदेखील चीनने भूतानच्या हद्दीत एक नवीन गाव वसवले असल्याचे समोर आले होते. चीनकडून सातत्याने आक्रमकपणे विस्तारवादी भूमिका घेतली जात असताना ही आगळीक अतिशय चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लडाखचा वाद अद्यापही शमला नसून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या हद्दीत काही चिनी सैनिक घुसले होते. त्यांना भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा चीनकडे सोपवण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतक-यांनी केले केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी घटना : जळगावात विजेच्या धक्क्याने चिमुकली तर नंदुरबारला तरुणाचा मृत्यू !

March 21, 2023

गोमुत्रावर संशोधन करा सांगणारा पंतप्रधान कधीच नसावा : डॉ.गौहर रझा

December 5, 2021

… अतिरेकाचा वापर करूनच भाजपनं २०१४ साली निवडणुका जिंकल्या : शिवसेना

June 7, 2021

धरणगावात योगेश वाघ व भरत महाजन यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

August 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group