धरणगाव (प्रतिनिधी) येथील भूमी अभिलेख कार्यालय धरणगाव तालुका मिळून एकूण 89 गाव आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून लिपिक कर्मचारी आठ असून तीन कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर शिपाई तीन असून त्या ठिकाणी एक-एक कर्मचारी कार्यरत आहे. यामुळे येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असून तात्काळ रिक्त पदावर कर्मचाऱ्यांची निमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या 89 तालुक्यांच्या बार पूर्ण आठ कर्मचारी यांच्यावर येत आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा वर्षापासून भुमिअभिलेख उपाधीक्षक हे पद देखील रिक्त आहे याठिकाणी दोन कर्मचारी जिल्हाधिकार्यालय सेंटरला कार्यरत करण्यात आलेली आहेत. शिपाई देखील रजेवर असतात नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रिक्त जागा लवकरात लवकर भरून समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी तालुका भूषण कडून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हा तालुका असून बालेकिल्ला देखील समजला जातो व एकीकडे भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आपल्याला दिसून येत असतो. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.