TheClearNews.Com
Saturday, November 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्वारी, मका, सोयाबीन हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे ; रोहिणीताई खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सध्या सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक अडचण भासत असल्याने शेतकरी बांधव तयार शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणत आहे. परंतु, किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. आधीच अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने या पिकांच्या उत्पादनात घट झालेली असून खाजगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन, मका, ज्वारीची खरेदी करत आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोयाबीन, ज्वारी, मका या शेतमालाचे किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सध्या सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांची काढणी सुरू आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने या पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. त्यातच किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू न झाल्यामुळे शेतकरी बांधव खुल्या बाजारात खाजगी खरेदीदार व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करत आहेत. परंतु, खाजगी व्यापारी किमान आधारभूत हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन, मका, ज्वारीची खरेदी करत आहेत. यात शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे.

READ ALSO

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

केंद्र शासनाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, तरी आतापर्यंत कोणतेही किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.
सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक अडचण भासत असल्याने खाजगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. केंद्र शासनाने सोयाबीनला प्रती क्विंटल 4 हजार 892 रुपये किमान आधारभूत हमीभाव किंमत निश्चित केलेली असताना खाजगी व्यापारी प्रती क्विंटल 3100 रुपयांनी खरेदी करत आहेत. हिच परिस्थिती मका, व ज्वारीची आहे.

यात शेतकरी बांधवांची आर्थिक लूटमार होत असुन त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तरी सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाची बाजारात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण शासन प्रतिनिधी या नात्याने शासनाकडे सोयाबिन, मका, ज्वारी या पिकांचे किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून ही केंद्रे सुरू करून शेतकरी बांधवांची होत असलेली आर्थिक लूटमार थांबवून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कमी भावात शेतमालाची विक्री करावी लागते आहे – रोहिणी खडसे
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या सोयाबीन, मका ज्वारी या पिकांची किमान हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना खुल्या बाजारात कमी भावात शेतमालाची विक्री करावी लागत आहे. यात शेतकरी बांधवांचे नुकसान होऊन उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही जर सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने धान्य खरेदीच झाली नाही त्या भावाने खरेदी करण्याची यंत्रणाच नसली तर हमीभावाची घोषणा करून काय फायदा? आधीच नैसर्गिक आपत्ती मुळे उत्पादनात घट झालेली आहे. त्यातच वाढलेल्या बी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती आणि त्यावर जि एस टी कर यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आता शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कमी भावात शेतमाल विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसुन त्यांना दुहेरी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तरी शासनाने हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी रोहिणी खडसे यांनी मागणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #FarmerMuktainagarRohini khadse

Related Posts

मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जिल्हा प्रशासन

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

March 18, 2025
Next Post

सुवर्णनगरीत टाटा समूहाच्या झुडियो स्टोअरचे गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

August 4, 2022

शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही !

October 4, 2022

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

September 1, 2024

खंडव्यात रेल्वेचा ब्लॉक, आठ रेल्वे गाड्या रद्द ; आठ गाड्या उशिराने धावणार !

July 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group