जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी १४ एप्रिल, २०२१ च्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी दि. १ मे, २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ सह विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. तर २० एप्रिल, २०२१ अन्वये सुधारीत विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बध दि. १५ मे, २०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपावेतो वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.