यावल (प्रतिनिधी) कोरोना काळात बंद असलेल्या न्हावी-फैजपूर बसेस सुरू करा, अशी मागणी युवा सेनेचे प्रसिद्धी प्रमुख अभय श्यामकांत पाटील यांनी यावल आगार प्रमुख भालेराव यांना सोशल मीडियाद्वारा निवेदन देऊन केली आहे.
कोरोनाचे नियम थोडे शिथिल झाले असल्याने शाळा, महाविद्यालय सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरी काही खेड्यातून विद्यार्थ्यांना येण्या-जण्यासाठी बस सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. न्हावी ते फैजपूर, सावदा, खिरोदा बस आणि ज्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी पूर्वी पासून बसेस सुरू आहेत त्या कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे बंद होत्या. त्यामुळे बस सेवा त्वरित सुरू कराव्यात जेणे करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. विद्यार्थी हिताची काळजी घेऊन लवकरच बस सेवा सुरू करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
युवासेना सावदा शहर प्रसिद्धी प्रमुख अभय श्यामकांत पाटील यांनी बस सेवा सुरु करण्याची मागणी केली. तसेच निवेदन दिल्यानंतर यावल आगारा प्रमुख भालेराव यांनी लवकरात लवकर बसेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.