जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन जळगांव विमानतळ येथून लवकरात लवकर ‘तिरुपती, इंदौर व अहमदाबाद’ साठी विमानसेवा चालू करण्याची मागणी केली.
यावेळी ना. रक्षा खडसे यांनी मागणी करतांना असे सांगितले की, जळगांव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लॅण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असून जळगांव विमानतळ येथून सध्या स्थितीत मुंबई व पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु आहे. परंतु येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुणे साठी संध्याकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा चालू करण्यात यावी. ना. रक्षा खडसे यांनी केलेल्या मागणीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सकारात्मक पणे घेऊन लवकरच केलेल्या दोन्ही मागणीवर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.