जळगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या वडिलांनी त्यांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही तसेच विवाहितेने माहेरुन १० लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील सदगुरुनगरमधील माहेर असलेल्या सायली संदीप माळी यांचा भडगाव येथील संदीप श्रीराम माळी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनी घर घेण्यासाठी माहेरुन १० लाख रुपये आणावे, अशी मागणी करण्यात येऊ लागली. या सोबतच सायली यांच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला जाऊ लागला.
या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती संदीप माळी, सासू अनिता माळी, दोन नणंद व अन्य एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.