मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार फुटले आहेत. या फुटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपाला डिवचले. आमदार फुटीमागे भाजपचंच कारस्थान आहे. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ईडीच्या भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कचाट्यात अडकले असून सरकार लवकरच पडेल अशा चर्चा रंगली आहे. तर यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत भाजपाला जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडीच्या भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. भाजपच्या काटस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात आमदार डांबून ठेवणं शक्यच नाही, अशी खोचकपणे टिका केली.
संजय राऊत म्हणाले, ईडीच्या भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले, जे आमदार पक्ष सोडून गेले, ते कोणत्या परिस्थितीत पक्ष सोडून गेले याचा खुलासा लवकरच केला जाणार आहे. संजय राऊतांनी खडेबोल सुनावले. आमचे दोन आमदार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते त्यांच्यासोबत काय काय घडलं आणि इतर आमदारांना कशी वागणूक दिली जातेय याची माहिती देतील, अशी माहितीही त्यांनी दिली.