TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“शेतकऱ्यांचे एकमेव उद्धारक नेते : बाबासाहेब..”

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in जळगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांविषयी एक सुप्रसिद्ध अन् लौकिकार्थ गीत आहे. यात विविध जाती, जमातीच्या शेतकरी कुळांचाही समावेश आहे. आज बाबासाहेबांची १३० वी जयंती यानिमित्त त्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन! त्यांची १३० वी जयंती साजरी करीत असताना दिल्लीच्या सीमेवर आपल्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना निश्चितपणे बाबासाहेबांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी केलेल्या आंदोलनाची स्मृती जागी झाल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्यांचा जगातील एकमेव प्रदीर्घ संप

READ ALSO

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व व कार्याची जगात तोड नाही. बहुआयामी असे हे व्यक्तिमत्त्व भारताला लाभले, हे या देशाचे भाग्यच. राष्ट्राच्या घटनेचे शिल्पकार, शोषित, वंचित, बहुजनांचे भाग्यविधाता, असे विविध पैलू माहीत आहेतच, पण त्याचबरोबर ते देशातील पहिले शेतकरी नेते, उद्धारकर्ते होते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ७० वर्षांत अनेक तथाकथित शेतकरी नेते झाले, मात्र, त्यांनी जो शेतकऱ्यांच्या वेदनांचा शाश्वत व मूलभूत मुद्दा मांडला व तडीस नेला तसा प्रयत्न आजतागायत कुणीही केला नाही. कोकणातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ‘ खोती ‘ पध्दतीविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९३० मध्ये एक व्यापक जनचळवळ उभारली. या आंदोलनाचा परमोच्च बिंदू म्हणजे चरी (कोकण) गावाच्या परिसरातील चौदा गावांनी तब्बल सात वर्षे खोती सावकाराच्या विरोधात प्रदीर्घ संप केला, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झालेला हा संप आतापर्यंतचा जगातील पहिलाच ठरला आहे.

पेशवाईची जुलमी खोती पद्धत

कोकणातील बहुतांश जमीन डोंगराळ असून, शेतकऱ्यांनी ती सपाट करून तसेच समुद्र खाडीकिनारी अत्यंत कष्टाने बंधारे बांधून शेतजमीन लागवडीयोग्य केली. इतिहासातील नोंदीनुसार आदिलशाहच्या काळापासून या भागातील जमीन महसूल गोळा करण्यासाठी खोतांची नेमणूक केली होती. खोतांनी ठराविक महसूल जमा करून राजाकडे सुपूर्द करून त्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवायचा, अशी त्या काळात रचना होती. तथापि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खोतांवर बंधने घालण्यात आली तसेच त्यांनी वतने द्यावयाची पध्दत देखील बंद करण्यात आली होती. परंतु नंतरच्या कालखंडात विशेषतः पेशवाईच्या काळात खोतांनी पुन्हा आपले उद्योग सुरू केले. महसूल जमा करण्यात मनमानी होऊ लागली. बहुतेक गावांत खोत हे सावकार म्हणूनच कार्यरत होते. अशिक्षित शेतकऱ्यांना कर्ज देऊन दामदुपटीने वसुली होऊ लागली, हळूहळू बहुतांश शेती खोतांच्या मालकीची झाली आणि मूळचे शेतकरी कूळ बनले.
खोतांनी सुलतानाप्रमाणे मनमानी सुरू केली. खोतांनी विविध मार्गाने बळकावलेल्या जमिनी कूळ कसू लागले. येणाऱ्या उत्पन्नातील बहुतांश वाटा खोत सावकाराला व अत्यल्प वाटा कुळांना मिळत असे. खोतांनी वेठबिगारी पध्दतही सुरू केली, वेठबिगारीस नकार देणाऱ्यास चाबकाने मारले जायचे, प्रसंगी मृत्युमुखी पडण्याच्याही घटना घडल्या. कुळांच्या घराजवळील फळे, कोंबड्या आदीही खोत उचलून नेत, एवढेच नव्हे, तर चांगले कपडे घालण्यासही बंदी होती. या गुलामगिरीमुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. खोती पद्धतीमुळे निर्माण झालेली विषमता व अन्यायाविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी नारायण नागू पाटील (रा. पेझारी), सुरबा नाना टिपणीस (महाड), भाई अनंत चित्रे यांनी व्यापक जनआंदोलन उभे केले.

कुळांचे वकील बाबासाहेब

खोतांच्या विविध प्रकारच्या जुलूमामुळे कोकणपट्टीतील वातावरण स्फोटक बनले होते. त्यातच दक्षिण कोकणातील तीन जमीनदार खोतांच्या हत्येचा प्रकार घडला व आरोप कुळावर ठेवण्यात आला, 23 व्यक्तींवर खटला भरण्यात आला. या खटल्यात कुळांची वकीलपत्रे बाबासाहेबांनी घेऊन त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली.

बाबासाहेबांचे शेती मालकी हक्काचे विधेयक

शेतकऱ्यांचा प्रदीर्घ संप सुरू असताना 16 डिसेंबर 1934 रोजी चरी (कोकण) येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांची सभा झाली. यावेळी बाबासाहेबानी भाषणात सांगितले, की “सद्य:स्थितीत मूठभर लोकांकडे शेतजमिनीची मालकी आहे. परंतु जे शेतात घाम गाळतात, कष्ट करतात त्यांच्याकडे जमीन नाही. या दोन्ही वर्गांत टोकाचा संघर्ष आहे. गेले काही वर्षे चरी व परिसरातील शेतकरी हे सावकार व जमीनदार यांच्याविरुद्ध संपावर गेले आहेत. अशाप्रकारचा वाद लवादामार्फत मिटविणे आवश्यक आहे. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे. कोकणातील खोती पध्दतीमुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे, याची मला जाणीव आहे. हा अन्याय यापुढे चालू द्यायचा नाही. या अमानवीय पद्धतीच्या अत्याचाराला सरकार जबाबदार असून, योग्य पद्धतीचा कायदा करणे हाच या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, म्हणून बाबासाहेबांनी खोती पद्धत नष्ट करण्याचे व कसणाऱ्याला जमिनीचे मालकी हक्क दिले जावेत, याबाबतचे विधेयक 17 सप्टेंबर 1937 रोजी मुंबई विधानसभेत मांडले. परंतु ते मंजूर झाले नाही. त्यामुळे सुमारे दहा हजार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काढण्यात आला. या मोर्चात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे, सातारा , नाशिक या जिल्ह्यांतील शेतकरी प्रामुख्याने सहभागी झाले होते. कसेल त्याची शेतजमीन, खोती पद्धत नष्ट करा, शेतमजुरांना किमान वेतन यासह इतर मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या.

अन् प्रदीर्घ संप मिटला

या जनआंदोलनामुळे सरकार हलले. तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांनी चरी या गावाला भेट दिली. तेथील नारायण नागू पाटील यांच्या विनंतीला मान देऊन संपात त्यांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यांनी लवादाचा निर्णय दिला. तब्बल सात वर्षे चाललेला संप मिटला. या लढ्याची खरी प्रेरणा, शेतकऱ्यांचे वास्तवरूपातील कैवारी बाबासाहेबच होते. ‘अन्यायाविरुद्ध पेटून उठा’ या संदेशाची खरोखर प्रचिती आली.

–-सुरेश उज्जैनवाल, जळगाव–
मोबाईल नंबर – (८८८८८८९०१४)

 

कोकण भागातील शेतकऱ्यांनी 1930 मध्ये पुकारलेल्या प्रदिर्घ संप प्रसंगी.शेतकऱ्या सोबत बाबा साहेब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
सामाजिक

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
Next Post

वो करे तो लीला, हम करे तो… जुर्म! : इम्तियाज जलील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Could Red Dog Be Just The Right Casino For You, Even Without Live Games?

November 20, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३०,५४९ कोरोनाबाधित, ४२२ रुग्णांचा मृत्यू

August 3, 2021

‘महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत’ : शिवसेना

July 5, 2021

यावलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या चार महिलांना रंगेहाथ पकडले ; ६ मोबाईल हस्तगत !

September 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group