TheClearNews.Com
Tuesday, June 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिंदे गटाचा दावा एका अर्थाने योग्य ; जाणून घ्या…सरन्यायाधींनी काय नोंदवले निरीक्षण !

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा उद्या शेवटचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2023
in कोर्ट, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिंदे गटाने आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नाही, म्हणून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याचा दावा केला. तो एका अर्थाने योग्य असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश यांनी नोंदवले. (Maharashtra Political Crisis)

…त्यामुळे आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही : नीरज किशन कौल
राज्यातल्या सत्तासंघर्षावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात रणकंदन सुरु असून आजची सुनावणी संपली आहे. उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत असून उद्या पुन्हा शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल युक्तीवाद करणार आहेत. दरम्यान, आम्हाला 21 तारखेला नोटीस पाठवली होती. त्यात बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. आम्ही या बैठकीला उपस्थित नव्हतो. इतकाच आमच्याविरुद्ध आरोप आहे. आम्ही दोन बैठकींना गैरहजर राहिलो. त्या आधारावर ते आम्ही स्वेच्छने सदस्यत्वाचा त्याग केल्याचे सांगत आहेत. मात्र, अजून आमदारांवर कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही. ते अपात्र ठरले तर त्यांनी निर्णय किंवा त्या निर्णयावर केलेले मतदान अपात्र कसे ठरवणार, असा सवाल कौल यांनी आज केला. बहुमत आणि व्हीप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. विधिमंडळाचे बहुतांश सदस्य त्यांच्या राजकीय अधिकारांनुसार प्रतोद नियुक्ती करतात. त्यानुसार आम्ही त्याच प्रतोदाचा व्हीपचे पालन केले, असे कौल यांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणता व्हीप पाळणार, असा सवाल केला. खरे तर विधिमंडळ पक्षाने नेमलेल्या प्रतोदचा व्हीपचे पालन व्हावे लागते. मात्र, इथे दोन व्हीप एकाच वेळी अस्तित्वात आहेत. मग तुमच्या मते बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीपचे पालन व्हायला हवे का, असा सवालही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारला.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सरन्यायाधीश काय म्हणाले?
दहाव्या सुचीनुसार विचार केला तर तुम्ही जरी म्हणत असाल की आम्हीच शिवसेना आहोत, तरी दोन गट तर आहेतच, फुट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असा नाही असं सरन्यायाधीशांनी नीरज किशन कौल यांना सांगितलं. दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईलच, कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतरच ठाकरे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे निर्देश दिले असं न्यायालयानं म्हटलं. तसेच नंतर सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच का बोलावलं असा सवालही न्यायालयाने विचारला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी चांगलीच रंगली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेत फूट पडली म्हणजे नेमके काय झाले, याचा पट तारीखनिहाय न्यायालयात उभा केला. शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नाही. त्यामुळेच त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा एका अर्थाने योग्य असल्याचे निरीक्षण यावेळी सरन्यायाधीशांनी नोंदवले.

शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत मविआच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी, म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या निवडीवेळी मतदान घेण्यात आलं होतं, त्यावेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. नेमक्या याच गोष्टीचा संदर्भ घेत नीरज किशन कौल यांनी आज युक्तीवाद केला. ते म्हणाले की, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले नसते, किंवा ते अपात्र जरी ठरले असते तरीही ते सरकार पडलं असतं. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. या लोकांचं मत ठाकरे सरकारला नव्हतं, कारण त्यांनाही सरकारवर विश्वास नव्हता, सरकारने त्यांचा विश्वास गमावला होता.

उद्या काय होणार ?
सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत सकाळी एक तास शिंदे गटाचे वकील नीरज कौल पुन्हा युक्तिवाद करतील. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद होईल. सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांचा युक्तिवादही दुपारच्या जेवणापूर्वी होईल. मध्यंतरानंतर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathshinde #eknathkhadse #updates #topnews #updatesnews#shivsena #cm #updates #topnews #liven #uddhavthackrey ewssuprim court

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
कोर्ट

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

April 19, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपळे बुद्रुक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा

April 19, 2022

‘नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू’ : चंद्रकांत पाटील

July 10, 2021

मित्रांसोबत खेळायला गेला…पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; वरणगाव येथे बालकाचा हौदात बुडून मृत्यू !

June 22, 2023

नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन !

September 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group