यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यात किनगावजवळ पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात किनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला. या अपघातातील दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी मजुरांना जळगाव जिल्हाआणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील अभोडा केराळे व रावेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.