नशिराबाद (प्रतिनिधी) गावातील वाढत्या डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे गावात फवारणी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे नुकतीच नगरपरिषदेला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
गावातील वाढत्या डेंग्यू आणि मलेरिया पेशंटची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेता लवकरात लवकर उपाययोजना व फवारणी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली. दरम्यान, कुठलेही उपायोजना न करण्यात आल्यास दि. १ ऑक्टोम्बर २०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे एक दिवशी आंदोलन व नगर परिषद कार्यालयात डास आणि मच्छर सोडून निषेध करण्यात येणार आहे.