TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, हे तर ‘संधीसाधू’ सरकार : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाढीव वीज बिले, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न तसेच इतर कारणांमुळे महावितरण कंपनीच्या विरोधात आज भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे एकमत नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. हे सरकार संधीसाधू आहे. असे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन म्हणालेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनप्रसंगी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे एकमत नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. हे सरकार संधीसाधू आहे. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना सर्वसामान्य जनतेशी देणेघेणे नाही. आज राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सत्तेत येण्यापूर्वी यांनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. परंतु, सरकारची आश्वासने हवेत विरली आहेत, अशा शब्दात भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाआघाडी सरकारवर टीकास्त्र डागले.

READ ALSO

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे, अपयश लपवण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी ते केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, आंदोलन करत आहेत. राज्याच्या सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक घोषणा दिल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळाली नाही. सरकारच्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या. सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

यावेळी जामनेर शहरातील नगरपालिका चौकापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुकाभरातील शेतकऱ्यांसह भाजपचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. हा मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार तसेच महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलेली वाढीव वीज बिले रद्द करावीत, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा, ट्रान्सफार्मर त्वरित बदलून मिळावेत, अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने यावेळी देण्यात आला.

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. घरेदारे विकली तरीदेखील ही बिले शेतकरी भरू शकणार नाही. अशी परिस्थिती आहे. परंतु तरीदेखील सरकार पुढाकार घ्यायला तयार नाही. आज रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. ट्रांसफार्मर जळाला तर तो बदलून मिळत नाही. एकंदरीतच सरकारचे उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. राज्यात कुणीही कुणाचे ऐकून घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
गुन्हे

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 26, 2025
जळगाव

महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवले !

June 26, 2025
गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
जळगाव

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

October 1, 2021

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिक, तृतीयपंथीयांशी संवाद !

August 20, 2023

मोठी बातमी : Katrina kaif, Vicky kaushal ला जीवे मारण्याची धमकी ; पोलिसात तक्रार !

July 25, 2022

आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group