मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयात नववर्षाचं स्वागत केलं. पोलिसांचं कर्तृत्व हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पोलिसांचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लावू शकणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तुम्ही दक्ष राहून काळजी घेता, जबाबदारी घेता त्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पोलीस सतत ताण-तणावात असतात. नव वर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणिवेतून मी महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सर्व पोलिसांना मी हे सांगतो आहे की तुम्हा सर्वांना फक्त हेच वर्ष नाही तर येणारी अनेक वर्षे सुखाची, समधानाची, भरभराटाची आणि ताणमुक्ततेची जावोत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले की, “कोरोनाच्या काळात फ्रण्टलाईनवर लढताना अनेक पोलीस शहीद झाले. कोरोनाचं संकट आल्यावर आपण लॉकडाऊन केलं. वर्क फ्रॉम होम, सगळ्यांना सांगितलं घरातून काम करा. क्षणभर विचार करा, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? पण तसं झालं नाही. म्हणून आता जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती त्यांच्यामुळेच.” ही परंपरा १००-१५० वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.