TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्यांनी तिरंग्याचा अपमान केला, ते आज देशावर राज्य करताहेत : अ‍ॅड. यशोमती ठाकूर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ज्या लोकांनी आजपर्यंत तिरंग्याचा अपमान केला, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आज देशावर राज्य करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशव्यापी चळवळ काँग्रेसने उभारली आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. याच अनुषंगाने आज (७ ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ज्या लोकांनी आजपर्यंत तिरंग्याचा अपमान केला, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आज देशावर राज्य करत आहेत. तुमचं-आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य देखील या लोकांनी हिरावून घेतले आहे, असे म्हणत अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

तुमचा फोन याठिकाणी आहे. पेगाससमुळे आपली खडानखडा माहिती त्यांना होते. ज्यावेळी देशाच्या सीमांवर देशविघातक कारवाया होतात, त्याची माहिती व्हावी. देश सुरक्षित रहावा. शत्रूंवर वार करता यावा म्हणून पेगासस सारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने त्याचा दुरुपयोग करून आपल्याला संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. या देशात सुख-समृद्धी नांदावी म्हणून आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. पण आज काय परिस्थिती आहे, खरंच देशात सुख-समृद्धी आहे का? पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. असे असताना आपण गप्प बसलो आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला अखंडपणे काम करण्यासाठी मिळाले आहे, हे प्रत्यकाने लक्षात घ्यायला हवे. म्हणून तुम्हाला-आम्हाला जागे व्हावे लागणार आहे. कारण आपला करार हा काही एका व्यक्तीसोबत किंवा देशासोबत नाही तर आपला करार हा नियतीसोबत आहे. त्यामुळे आज अन्याय, अत्याचार होत असताना, संविधानाचा पावलोपावली अपमान होत असताना तुम्ही बोलत नाही. तुमचा आत्मा दुखत नाही तेव्हा नियतीच्या कराराचा भंग आपण करतोय, हे लक्षात घ्या’, असे यशोमती म्हणाल्या.

आपण नियतीशी करार केला आहे. देशाला निरोगी ठेवण्याची शपथ घेतली आहे. पण आज नियतीचा करार पाळला नाही म्हणून काय झालं असं वागलो तर कोरोनासारखी महामारी आली. कोरोना आपल्याकडे येऊ नये म्हणून राहुल गांधी ओरडून ओरडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची केंद्र सरकारला विनंती करत होते. पण त्यांच्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले’, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला, वाचा कसा घडला नीरज चोप्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांभोरी बु.येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्ते काँक्रीटीकरण व बाला अंगणवाडीचा शुभारंभ !

October 22, 2022

कडधान्याबाबत स्टॉक लिमिट धोरणाविरुद्ध बाजार समित्यांमधील व्यवहार उद्या राहणार बंद

July 4, 2021

ब्रेकिंग न्युज : धरणगाव शहरातील जनता कर्फ्यु ३० मार्चपर्यंत वाढवला !

March 26, 2021

गुड शेपर्ड स्कुलमध्ये गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त पूजन

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group