जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना आज लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात सकारात्मक अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने केली होती.
नेमकं काय आहे प्रकरण !
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे (वय-३०) आणि समाधान लोटन पवार (वय-३५) या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा सकारात्मक अहवाल तयार करून दिल्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपय द्यावे लागतील, असे सांगितले. परंतू तक्रारदारची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी शनिवारी ९ मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. लाच मागण्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार हे ३० हजार पैकी २०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ यांनी सापळा यशस्वी केला