चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात वातावरणात दर तासाला बदल होत असून दोन दिवसांपासून उकाडा कमी अधिक होत आहे. त्यामुळे पावसाची हजेरी केव्हा लागेल हे सांगता येत नव्हते. ढगाळ वातावरणामुळे चोपडा तालुक्यात आज दुपारी दोन ते तीनच्या सुमारास धानोरा, मितावली, पंचक, गोरगावले, खेडीभोकरी, माचला परिसरात अवकाळी पावसाच्या हजेरीसह गारपीठ झाली.
जवळपास 15 ते 20 मिनिट ही गारपीट झाली. या या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अवकाळी पावसाने मात्र शेतकरी भयभीत झाला आहे.