बोदवड (प्रतिनिधी) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत उमेद अभियान अंतर्गत बाल विवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे.
सानेगुरुजी फाॅऊडेशन अमळनेर यांच्या माध्यमातून बोदवड तालुक्यात जनजागृतीपर मोहीम सुरू आहे .या निमित्ताने बोदवड शहर व नाडगाव येथे महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी आमच्या मुलींचे लग्न अठरा वर्ष व मुलांचे वय एकवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत करणार नाही अशी शपथ घेतली व बचत गटांच्या माध्यमातून बालविवाह होऊ नये या साठी समाजात जनजागृती करत राहण्याचा संकल्प घेतला. या कार्यक्रमाला बोदवड येथे सौभाग्य महिला बचत गट ,मंकाई महिला बचत गट ,श्रध्दा महिला बचत गट,वैदेही महिला बचत गट, स्वामि विवेकानंद महिला बचत गट, दशामाता महिला बचत गट , महालक्ष्मी महिला बचत गट,अंगणवाडी ताई सौ. रत्नप्रभा फाटे, सौ.रुपाली फाटे .या बचत गटांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला तर नाडगाव येथे प्रगती महिला बचत गट, आंगणवाडी ताई मंगला राजपूत, विजया कदम यांच्या सह बचत गट सदस्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनास उषा संतोष पवार यांनी परिश्रम घेत महिलांशी संवाद साधत या अभियानाविषयी माहिती दिली.