मुंबई (वृत्तसंस्था) राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे होते है, त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
संजय राऊत मीडियाशी बोलताना ही टीका केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे, केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे, पूर्वी असं कधी घडलं नाही. आता दोन वर्षात हे सुरू झालंय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. आता यात शरद पवारांनाही घुसडले आहे. भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत, असं राऊत म्हणाले.
राजकारण म्हटलं तर हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. विरोधकांना सांगतो. ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये. आमच्याही हातात एक दगड असू शकतो. आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही. आम्ही कमरेखालचा वार केला नाही. पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत म्हणाले. भाजपने शरद पवारांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे. ते त्यांचं अधिकृत मत आहे का याचा भाजपने खुलासा करावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी त्यावर बोलावं शरद पवार गेल्या ५० वर्षापासून संसदीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे, असंही राऊत म्हणाले.