मुंबई (वृत्तसंस्था)शिवसेनेतून फुटून गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पुढे काय करणार?, याची उत्सुकता सध्या सर्वांनाच आहे. सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांच्यापुढे फक्त पाच मुख्य पर्याय आहेत.
महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. बंडखोर आमदारांन विरूद्ध कायदेशीर लढाईच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने शिंदे गटाने परतीचे दोर कापले असल्याची चर्चा असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.
जर 16 आमदार अपात्र ठरले तर?
बुधवारी बोलावण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीला हजर न राहिल्याने बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि इतर 16 आमदार अपात्र ठरले, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. तर स्वतः शिंदेंचीच आमदारकी त्यामुळे रद्द होईल. अर्थात, ते न्यायालयात जाऊ शकतात,
अविश्वास प्रस्तावासाठी राज्यपालांना पत्र?
एकनाथ शिंदे सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखवून राज्यपालांना पत्र लिहू शकतात. जवळपास ५० आमदार गटात उपस्थित झाले. दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन त्यांना इतर कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल.
ठाकरेंकडे घरवापसी
बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत येऊ शकतात आणि महाविकास आघाडी सरकारचा कारभार पूर्वीसारखाच सुरळीत सुरू होऊ शकतो. दोन गट एकत्र येऊ शकतील, असं वातावरण सध्या तरी दिसत नाही.
भाजपात विलीन होण्याचा निर्णय?
भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांसमोर आहे. मात्र त्यामुळे एक समस्या निर्माण होणार आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या नावाने यापैकी कुणीच राजकारण करू शकणार नाहीत. याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षामध्येही ते सहभागी होऊ शकतात.
शिवसेनाच ताब्यात घेऊ शकतात?
विधानसभेतील दोन तृतीयांश आमदार सोबत घेऊन उद्धव ठाकरे पक्षच ताब्यात घेऊ शकतात का? ही शक्यता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात ते सोपं नाही. पक्षाची घटनेत केलेल्या तरतुदीनुसार शिवसेनेवर ताबा मिळवायचा असेल तर पक्षप्रमुखपद शिंदे गटाला जिंकावं लागेल. त्याचप्रमाणं राष्ट्रीय कार्यकारिणीतही आपले बहुतांश सदस्य निवडून आणावे लागतील.