उस्मनाबाद (वृत्तसंस्था) आताच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाची खाज का निर्माण झाली? असे वादग्रस्त विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उस्मनाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
तानाजी सावंत मेळाव्यात बोलताना म्हणाले की, यापूर्वी दुट्टपी राजकारणात मराठा आरक्षण अडकलं होतं. मात्र आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच.” मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे सवालही यावेळी बोलताना सावंत यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. यापूर्वीही ते हाफकिनसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली असून पुन्हा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.