मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सुरू असलेले राजकारण पाहता, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसत असले तरी शिंदे यांच्या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे.अशी चर्चा आता राजकारणात सुरू आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाही.त्यामुळे हे सगळे घडतेय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,असे मत राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे.
रविवारी कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी खडसे म्हणाले, कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल. गेल्या ४० वर्षात अस राजकारण मी अनुभवले नव्हते. कोण कोणा बरोबर चालत यावर आता विश्वास नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले.
राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहे. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे. मात्र केंद्र सरकारला वाटते ही सुरक्षा अपुरी आहे. म्हणून केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. इतकेत नाही तर मला छळले मात्र, माझ्या हाती इतकी ताकद आहे की, अनेकांना देशोधडीला लावू शकतो. यामध्ये असे चित्र दिसतेय की एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो तांत्रिक बाबींची सोडवणून झाल्याशिवाय निकाली निघणार नाही.