मुंबई (वृत्तसंस्था) देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत असून महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात ८७ हजार ५०५ कोरोना आणि ४६७ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात ८७ हजार ५०५ कोरोना आणि ४६७ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ५ हजार ३३१ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ७९७ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ३३० बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९७ लाख ७७ हजार ७ कोरोना चाचण्यांपैकी ६७ लाख ५७ हजार ३२ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६७ लाख ५७ हजार ३२ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख २४ हजार २४७ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५८१ मृत्यू झाले तसेच ३६९९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ५ लाख १३ हजार ७५८ होम क्वारंटाइन तर १३६६ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के आणि रिकव्हरी रेट ९६.५५ टक्के आहे.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ नवीन रुग्ण आढळले
देशात करोनाची तिसरी लाट आल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं नसली तरी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ९० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत १९, १५२ जण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण ३.५१ कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४.८२ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २.७५ हजारांवर गेली आहे. देशात आतापर्यंत ३.३४ कोटी जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे.
ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची २ हजारांवर संख्या
देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एकूण ४६७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमिक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.