जळगाव (प्रतिनिधी) गेल्या कही दिवसांपासून चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मंगळवारी जिल्ह्यात आले होते. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बाहेरगावी होते. मात्र, दोघांमध्ये संवाद झाल्याची चर्चा होती. याबाबत नेते एकनाथराव खडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी होय मला फडणवीस यांचा फोन आला होता, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसापूर्वी वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आले होते. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बाहेरगावी होते. मात्र, दोघांमध्ये संवाद झाल्याची चर्चा होती. याबाबत नेते एकनाथराव खडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी होय मला फडणवीस यांचा फोन आला होता, असे सांगितले. फोनवरुन नमस्कार झाल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी, इकडे मुंबईत आहे.. आपण आलात, आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका..’ या आग्रही विनंतीला फडणवीसांनी ‘आपल्या भागात आलोय. जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की भोजन करेल..’ असे नम्रपणे सांगितले.