नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
न्यूज १८ लोकमतशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. एवढेच नव्हे तर, केंद्राने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असेही राणा म्हणाल्या. कंगना रणौत आणि शिवसेना वादावर बोलताना नवनीत राणा यांनी तिने फक्त आपल्याबद्दल बोलावे, इतरांबद्दल नाही. बॉलिवूडने तिला सर्व काही दिलं असून त्यावर आरोप करु नयेत, असा सल्ला दिला. दरम्यान, याआधी नवनीत राणा यांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी म्हणत संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.