मुंबई (वृत्तसंस्था) पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत ५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत गणेश दत्तू (वय ४५) आणि अमोल काळे (४०) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली होती. या पाईपलाईनच्या दुरुस्तीच काम सुरू करतांना अचानक ७ कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले आहे. या दुर्घटनेत नाना पुकळे (४१), महेश जाधव (४०), राकेश जाधव(३०) अनिल चव्हाण (४३), नरेश अधांगळे(४०) अशी जखमींची नावं आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना नेमकी कशी आणि का घडली याचा तपास करण्यात येत आहे.