लखनऊ (वृत्तसंस्था) युक्रेन-रशिया लढाईमुळे (Ukraine_Russia_War) जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे. तुम्ही याआधी भक्कम असं सरकारं दिलं आहे तर लक्षात ठेवा या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला मत देण्यासाठी जात नाही आहात. उमेदवाराला विसरा आणि मोदींच्या नावे मत द्या, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी केले आहे.
भाजपचे उमेदवार रविंद्र नाथ त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी अनुप्रिया पटेल भदोहीत गेल्या होत्या. तेव्हा केंद्रीय मंत्री अनुप्रिया यांनी म्हटलं की, मोदी सरकारने खूप काही केलं आहे. युक्रेन-रशिया लढाईमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. चारही बाजुला आगीचे लोळ उठताना दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मोदी सरकार भारतीयांना सुखरूप मायदेशी आणत आहे.
सरकारचे चार मंत्री तिथे गेले असून नागरिकांना विमानात बसवून बॉम्बस्फोटातून सुरक्षित वाचवून घरी आणत आहेत.हे असतं मजबूत सरकार आणि हे सरकार तुम्ही बनवलं आहे. तुम्ही इथं कोणत्या उमेदवाराला मत द्यायला जात नाही आहात. उमेदवाराला विसरून जा असेही त्यांनी म्हटले. देशाच्या विकासासाठी, मजबुतीसाठी आणि उत्तर प्रदेशच्या आनंदासाठी तुम्ही मत द्यायला जाणार आहात. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये जसा विश्वास दाखवलात तसा आताही दाखवा असं म्हणत अनुप्रिया पटेल यांनी मतदारांना आवाहन केलं.