मुंबई (वृत्तसंस्था) मागच्या २४ तासात ७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के इतकं झाले आहे.
राज्यात ७ हजार ३०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ५९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६२ लाख ४५ हजार ५७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या राज्यात ९४ हजार १६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ५ लाख ५१ हजार ८७२ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३ हजार ७४३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत गेल्या २४ तासात ३९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ८ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं आहे. सध्या मुंबईत ५ हजार ८९७ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार १५२ वर पोहोचला आह. १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान रुग्ण वाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.