नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर येथे पंजाबच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. पंजाब ह्यूमन राइट्स ऑर्गेनायजेशन नावाच्या एका एनजीओने हा दावा केला आहे.
पंजाब मानवाधिकार संघटना या एनजीओने दावा केला की, २६ जानेवारी रोजी मोगा येथील तातारुवाला गावातून १२ शेतकरी बेपत्ता झाले. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, खलरा मिशन, पंथी तालमेल संघटना यांच्याशिवाय पंजाब मानवाधिकार संघटना यांच्याशिवाय विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर जवळपास १०० हून अधिक आंदोलक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर १८ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या १८ पैकी सात जण पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील आहेत. अटक झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी २३ जानेवारी रोजी निघाले होते. प्रजासत्ताक दिनासाठी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. यातील जवळपास १०० आंदोलक शेतकरी गायब झाले आहेत. पंजाब ह्यूमन राइट्स ऑर्गेनायजेशन शिवाय दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, खालरा मिशन, पंथी तालमेल संघटना यांचासह विविध संघटनांनी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले, मोगाच्या ११ आंदोलकांना नांगलोई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची आता तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूर आणि नरेला भागात देखील अटकसत्र राबवण्यात आलं. मनजिंदर सिंह सिरसा यांनी जखमी आंदोलक शेतकऱ्यांना सेंट स्टीफन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं म्हटलं आहे.