भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. मात्र बुधवारी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सीजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली होती, अशा बिकट स्थिती भाजपचे डॉ. नी. तू. पाटील यांनी स्वखर्चातून १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला. यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत हा साठा टिकला.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सीजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सीजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सीजन देता येणार होता. यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक तथा भुसावळ ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नी. तू. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदूस्तान एजन्सीतून सात हजार रुपयांचे तुर्त दहा सिलेंडर खरेदी करुन ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. हा ऑक्सीजनचा साठा गुरुवारी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत टिकू शकेल. यानंतर मात्र पून्हा सिलेंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रुग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सीजनचा पुरवठा हेात नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.
५० वाढीव बेडचे नियोजन फोल
ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सीजनयुक्त सुविधेचे ५० बेडचे नियोजन आहे. यासाठी १५ क्युबीक मिटरचा ऑक्सीजन जनरेशन प्लॉटला आमदार संजय सावकारे यांनी ३० लाखांचा निधी दिला आहे. मात्र सप्टेंबरपासूनचे हे नियोजन सात महिने उलटूनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे मात्र ऑक्सीजन अभावी रुग्ण मरणाच्या दारात आहेत.
रस्त्यावर उतरावे लागेल
बुधवारचा दिवस व रात्र ऑक्सीजन सिलेंडरमुळे लोटली गेली, मात्र गुरुवारी पून्हा पुरवठा लागणार आहे. यामुळे समाजातील दानशुरांनी मदत करुन किमान ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन रुग्णांचा जिव वाचवावा. जिल्हा व आरोग्य प्रशासन सुस्तावले असून आता रस्त्यावर उतरावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. असे डॉ. नि. तू. पाटील म्हणाले.
एकीकडे १४ रुग्णांनाच्या जीवाची भीती अन दुसरीकडे गेंड्याच्या कातडीचे आरोग्य प्रशासन
संध्याकाळ पर्यंतच ऑक्सिजन सिलेंडर वर १४ रुग्ण तग धरून राहतील आणि रात्री मात्र सर्वांच्या जीवाला धोका आहे, कारण ऑक्सिजन संपेल आणि पुरवठा पण ठप्प आहे. अशी माहिती जेव्हा डॉ. नि. तू. पाटील यांना दुपारी दि. १४ एप्रिल २०२१ ला कळली, तेव्हा त्यांनी लगेच जिल्ह्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सूर्यवंशी, जे जिल्हा ऑक्सिजन सेवा सध्या नियंत्रित करत आहे, त्यांना व्हाट्सअप्प करून कल्पना दिली, पण संध्याकाळपर्यंत कोणीही प्रतिसाद दिला नाही.
शेवटी डॉ. नि. तू. पाटील यांनी माझ्या ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित, भुसावळतर्फे १४ रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी ते स्वतः भुसावळ MIDC मध्ये गेलेत, पण तिथेही तुटवडा असल्याने फक्त ५ ऑक्सिजन सिलेंडर भरून मिळाले आणि आज सकाळी १० वाज्यापर्यंत ५ भरून मिळतील.
“जिल्हा आरोग्य प्रशासन गेंड्याच्या कातडीचे….”
मागील २ दिवसापासून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे ऑक्सिजन कमतरता आणि ठेकेदार थकबाकी याबद्दल पाठपुरावा करत आहे, पण जिल्हा आरोग्य प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे. आज बाह्य ऑक्सिजन १४ रुग्णांना मिळाला नसता तर विपरीत परिस्थिती आली असती, म्हणून आज स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर भरून रुग्णांच्या जीव वाचवला, आता उद्या परत हीच परिस्थिती निर्माण होईल. भुसावळ मधील दानशूर व्यक्ती /सामाजिक संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. नि. तू. पाटील यांनी केले.