TheClearNews.Com
Thursday, June 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन ४८ तास सामूहिक बलात्कार ; १४ नराधमांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन ५ वेगेवेगळ्या ठिकाणी ४८ तास अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी १४ जणांना अटक केलीये.

या प्रकरणात मशक कन्याल (वय २७), अकबर शेख (वय ३२), अझरुद्दीन अन्सारी (वय २७), नोएल खान (वय २४), आसिफ पठाण (वय ३६), प्रशांत गायकवाड (वय २९), रफीक शेख (वय ३२), राजकुमार प्रसाद (वय २९), गोलू (वय १९) आणि इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

खळबळजनक : शिक्षक पित्याने घेतला मुलीचा जीव !

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की, ३१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता हा घटनाक्रम सुरू झाला. मुलीचे आई -वडील अत्यंत गरीब आहेत आणि पुण्यात अनेक वर्षांपासून नर्सरीमध्ये काम करत आहेत. त्या वेळी, कोणालाही न सांगता, अल्पवयीन आपल्या १९ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती ऑटोने पुणे स्टेशनला पोहोचली. बराच वेळ इथे उभे राहिल्यावर जेव्हा तिचा मित्र आला नाही तेव्हा ती रडू लागली. तिला रडताना पाहून एक ऑटो चालक तिच्याकडे आला. त्याने मुलीला स्टेशनबाहेर येण्यास सांगितले, तिचा मित्र तिला बोलवत असल्याचे तो म्हणाला. मुलगी अस्वस्थ होती आणि तिला वाटले की ऑटो चालक खरे बोलत आहे. यानंतर त्याने मुलीला बाहेर आणले आणि तिला पिण्यासाठी पाणी दिले. मुलीचे म्हणणे आहे की तिने पाणी प्यायल्याबरोबर तिला चक्कर आल्यासारखे वाटले.

सर्वप्रथम, मुलीला रिक्षात बसवलेल्या त्या ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर, त्याने आणखी काही लोकांना बोलावले आणि मग प्रत्येकाने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. डीसीपी पाटील म्हणाले की, पीडित मुलगी सलग त्यांच्यासमोर ओरडत आणि हात जोडत होती. परंतु आरोपींने तिला कपड्यांशिवाय खोलीत बंद ठेवले. दर काही तासांनी एक नवीन व्यक्ती येऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. मुलगी सतत कपडे आणि अन्नाची मागणी करत होती, पण कोणीही तिच्यावर दया केली नाही. बलात्कारानंतर आरोपी तिला धमकावत होते की जर तिने बाहेर गेल्यानंतर कोणालाही काही सांगितले तर ते तिला ठार मारतील.

वडिलांनी सांगितले की, घरातून गेल्याच्या पुढच्या सकाळी त्यांना कळाले की, मुलगी घरात नाही. मुलीच्या मोबाईलवर फोन डायल केला, पण तो बंद होता. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. तपास सुरू झाला आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे स्पष्ट झाले की मुलीचे अपहरण येथूनच झाले आहे. नम्रता पाटील यांनी सांगितले की प्रथम मुलगी ऑटोरिक्षात बसलेली दिसली.

ऑटो चालकाने मुलीचे अपहरण केले आणि एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या एका मित्राला बोलावून अल्पवयीन मुलीला त्याच्या स्वाधीन केले. यानंतर, मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि इतर तीन लोकांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही त्याच हॉटेलमध्ये आणखी चार जणांनी पीडितेला आपल्या वासनेचा बळी ठरवले. त्यानंतर आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेले आणि तिथेही तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पुण्यातील विश्रांतवाडी, विमान नगर, कोंढवा आणि इतर काही ठिकाणी १२ आरोपींनी मुलीवर बलात्कार केला.

मुलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती धोक्याच्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शारीरिक जखमा बऱ्या होऊ शकतात, पण त्याने जो मानसिक आघात केला तो कदाचित आयुष्यभर भरून निघणार नाही. मुलीचे कुटुंबीय फक्त एवढेच सांगत आहेत की आम्ही आधीच अस्वस्थ आहोत, आमच्याशी बोलून आमचा त्रास वाढवू नका. डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की हे खरोखरच अंगावर काटा आणणारे प्रकरण आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
गुन्हे

खळबळजनक : शिक्षक पित्याने घेतला मुलीचा जीव !

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
Next Post

पत्रकार बांधवांच्या मागण्यांसाठी आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात रंगणार !

September 22, 2023

संतापजनक : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती ; पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 17, 2023

पाचोरा हादरलं : काकाने केला पुतण्याचा खून ; संतप्त नातेवाईकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक !

November 30, 2022

धरणगावातून दोन मोटारसायकली चोरीला !

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group