नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामधून १० हजार ६१६ रुग्ण केवळ पाच राज्य, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळले. तर महाराष्ट्रात मंगळवारी २९३६ लोक कोरोना संक्रमित आढळले आहे.
सर्वात जास्त ५५०७ कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट केरळमध्ये समोर आले. हा सलग तिसरा दिवस होता जेव्हा रुग्णांची संख्या १७ हजारांनी कमी राहिली. यापूर्वी ९ जानेवारीला १८ हजार ४५३ रुग्ण आढळले होते. मंगळवारी १७ हजार ७४७ रुग्ण बरे झाले आणि २०० जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत १ कोटी ४ लाख ९३ हजार ७५८ लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये १ कोटी १ लाख २५ हजार ४२५ लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता १ लाख ५१ हजार ५२५ झाली आहे. तर महाराष्ट्रात मंगळवारी २९३६ लोक कोरोना संक्रमित आढळले. ३२८२ रुग्ण बरे झाले आहेत आणि ५० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १९.७४ लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून १८.७१ लाख लोक बरे झाले आहेत. ५० हजार १५१ लोकांनी जीव गमावला आहे. तर ५१ हजार ८९२ जणांवर उपचार सुरू आहेत.