नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑक्सिजनसाठी दिल्लीचे प्राण कंठाशी आले आहेत, असं म्हटलं तर अतिशोयक्तीचं ठरणार नाही. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. आता दिल्लीच्या जयपूर गोल्ड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केलाय, काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच आणखी एक हॉस्पिटल सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. त्यांना डिस्चार्ज देत असल्याचं हॉस्पिटलनं म्हटलं आहे.
दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचं रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं अशीच भयावह स्थिती आहे.