नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ५ हजारांनी वाढ झाली. गेल्या २४ तासांत २३ हजार ५२९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३११ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
गेल्या २४ तासांत देशामध्ये २३ हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ हजार ०२० झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन कोटी ३७ लाख ३९ हजार ९८० नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात ३११ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४८ हजार ०६२ वर पोहोचला आहे.
तर गेल्या २४ तासांत ६५ हजार ३४ लाख ३०६ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ८८ कोटी ३४ लाख ७० हजार ५७८ झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी ३,१८७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल ३ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६८ हजार ५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.